शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

सरकारविरोधात रस्त्यावर या; मी तुमच्यासोबत : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:07 IST

कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करून घेतात, तर मग महाराष्टÑातील व्यापारी हे का करू शकत नाहीत? तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करीत, सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊ

ठळक मुद्देव्यापारी, उद्योजकांशी संवाद; जानेवारीत व्यापारी, उद्योजकांच्या प्रश्नांवर मुंबईत बैठक घेणारटेंबलाई उड्डाणपुलाजवळील एका हॉटेलमध्ये आयोजित व्यापारी-उद्योजकांशी संवाद कार्यक्रम कोल्हापूरच्या विकासासाठी एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत

कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करून घेतात, तर मग महाराष्टÑातील व्यापारी हे का करू शकत नाहीत? तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करीत, सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्याची तुमची तयारी असेल तर मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे व्यापारी-उद्योजकांना दिली.

टेंबलाई उड्डाणपुलाजवळील एका हॉटेलमध्ये आयोजित व्यापारी-उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सतर्फे व्यापारी व उद्योजकांच्या ‘जीएसटी’सह विविध अडचणी व प्रश्नांंबाबतचे निवेदन उद्धव ठाकरे यांना दिले. यानंतर उद्योजक, व्यापाºयांनी आपल्या अडचणी व प्रश्न मांडले.

उद्धव ठाकरे म्हणाले, व्यापारी व उद्योजकांनी आपल्याकडे मांडलेल्या प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्र्याशी चर्चा करू; परंतु ‘जीएसटी’सह विविध प्रश्नांवर महाराष्टÑातील व्यापारी, उद्योजक गप्प का आहेत, असा प्रश्न पडतो. ते दबलेले असून आपल्या न्यायासाठी त्यांचे त्यांनाच उभे राहावे लागेल. त्यांनी रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्याची तयारी ठेवल्यास मीही त्यांच्यासोबत राहीन. त्यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जानेवारी महिन्यात मुंबईत व्यापारी व उद्योजकांच्या प्रश्नांवर बैठक घेतली जाईल.चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने म्हणाले, केंद्र व राज्य सरकारकडून व्यापारी व उद्योजकांसाठी जे काही करता येईल त्यासाठी प्रयत्न केले जावेत.

उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले, उद्योगासाठी विजेचे दर कमी करण्यासाठी सरकारकडे भूमिका मांडली जावी. कोल्हापूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर म्हणाले, शहरात दिल्लीसारखे ट्रॅफिक झाले असून यासाठी उड्डाणपूल होण्याची गरज आहे. तसेच वॉल मार्क कंपनीला शिवसेनेने बाजारात पाय ठेवू देऊ नये.

‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या विकासासाठी एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत. माजी अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, कोल्हापूरच्या विकासासाठी कोल्हापूर-बंगलोर कॉरिडॉरला चालना मिळावी.गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरजितसिंह पोवार म्हणाले, उद्योगवाढीसाठी जागा उपलब्ध नसून ती उपलब्ध करून द्यावी. इलेक्ट्रिकल असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी म्हणाले, शेतीउपयोगी इलेक्ट्रिक साहित्यावरील ‘जीएसटी’चे दर कमी व्हावेत.

‘क्रीडाई’चे अध्यक्ष महेश यादव म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी. केमिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील म्हणाले, ‘जीएसटी’मुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून औषधांचे दर वाढले आहेत.यावेळी संजय शेटे, गोरख माळी, जयेश ओसवाल, संदीप नष्टे, आदींसह व्यापारी उद्योजक उपस्थित होते.सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडेकेंद्र व राज्य सरकार नोटाबंदीसारखे मनमानी निर्णय घेऊन सर्वसामान्यांना कष्टाच्या पैशांसाठी रांगेत उभे करीत असेल, तसेच स्वत:च्या पैशासाठी बोटाला शाई लावून घ्यावी लागत असेल, तर ही वाटचाल हुकूमशाहीआणि कम्युनिझमकडेच सुरू असल्याचे म्हणावे लागेल, असे ठाकरे यांनी सांगितले.सरकार म्हणजे ‘नवसाचे पोर’सरकार म्हणजे नवसाचे पोर असून ते उडाणटप्पू निघाल्यास काय बोलायचे ? असा टोला लगावत, ते पोर बिघडले म्हणून त्याला बोलण्याचे धाडस दाखवायचे का नाही? का नुसत्याच पेकाटात लाथा खायच्या, अशी कोटीही ठाकरे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण